मुक्काम केलेल्या परिसरातील हनुमान मंदिर
गावात शिरल्यावर समोर घराच्या बाजूने पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर पोहोचायला मोजून १० मिनिटे लागतात.खरे तर मला वाटते हा किल्ला गावाच्या सरहद्दीपर्यंत पसरलेला असावा परंतु काळाच्या ओघात येथे वस्ती झाली असावी.पायऱ्या चढल्यावर वाटेत पडका बुरुज लागतो.बुरुज पाहून सरळ पुढे गेल्यावर किल्ल्यावरील एकमेव वाडा लागतो.वाडा बऱ्यापैकी मोठा आहे.
पायऱ्यांचा मार्ग
बुरुज
वाडा
वाड्याचा अंतर्भाग
वाड्याच्या खालची बाजू हि महाराष्ट्र सीमेकडे जाते पण तिथे न जाता उजव्या बाजूला जावे.ह्या किल्ल्यावर झाडीचे प्रचंड साम्राज्य असल्याने काळजी घ्यावी.चालत गेल्यावर तुटक पायऱ्या व दगडांच्या साहाय्याने उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण आत शिरतो. दरवाजाच्या बाजूला तटबंदी व पहारेकऱ्यांच्या देवड्या सुद्धा आहेत .दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला कमान लागते ह्या कमानीतून खालील गाव व आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.टेहळणीसाठीचीच बहुदा हि खिडकी असावी. कमान पाहून उजव्या बाजूला वळावे व सावकाश चिंचोळ्या मार्गाने दगडावर चालून किल्ल्यावरील बुरुजावर जाता येते.बुरुजाच्या आजूबाजूला तटबंदी आहे परंतु झाडीमुळे ती दिसत नाही.बुरुजावर तोफ ठेवली आहे.
प्रवेशद्वार
टेहळणी कमान
देवड्या
बुरुजावरून सुंदर परिसराचा आस्वाद घेऊन मी खाली उतरलो आणि परतीच्या मार्गी लागलो.ह्या किल्ल्यावर एक विहीर पण आहे परंतु खूप झाडी असल्या कारणाने बघता आली नाही.मात्र हि विहीर पाहताना वाटेत एक गमतीशीर गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे हि वाट जेथून सुरु होते तिथूनच्या उजव्या बाजूचा भाग हा महाराष्ट्रात मोडतो व डावीकडचा भाग कर्नाटकात. हे सुचवणारा सिमेंटचा खांब लावलेला आहे.अशा प्रकारे आल्या वाटेने पुन्हा किल्ल्याच्या माळरानावर आलो येथे सुद्धा एक पडका बुरुज पाहायला मिळाला.
सीमांचे माहिती दर्शक खांब
किल्ला पाहून झाल्यावर गावाच्या सुरुवातीलाच एका घरासमोर पुरातन चावीच्या आकाराची विहीर पाहायला मिळते.अशीच एक विहीर बदलापूर जवळील देवळाली गावात आहे. विहिरीत उतरायला १८ पायऱ्या आहेत.ह्या विहिरीला ठराविक अंतरावरती कमानी आहेत.विहीर अत्यंत रेखीव आहे आणि दोन स्तरावर विभागली गेली आहे .विहीर पाहून दुपारच्या सुमारास आम्ही बेळगावास परत निघालो ट्रेक मधला शेवटचा किल्ला पाहण्यासाठी अर्थात बेळगाव चा किल्ला पाहण्यासाठी.
सडा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली पुरातन विहीर
संध्याकाळी ४ च्या सुमारास आम्ही बेळगावला पोहोचलो.बेळगावचा किल्ला हा भुईकोट प्रकारात मोडतो.किल्ला सध्या मिलिटरी च्या अखत्यारीत येत असल्याने अत्यंत सुस्थितीत आहे. ह्या किल्ल्याच्या पण बाहेर भुई किल्ल्यांच्या शिरस्त्याप्रमाणे खंदक खोदले आहे.त्या पुढे सरकारी कचेऱ्या व अंबाबाई आणि गणपती मंदिरआहे. पुढे कमानी सदृश्य प्रवेशद्वार आहे.किल्ल्यात छायाचित्रणाला बंदी आहे.किल्ल्यात शिरल्यावर बऱ्याचश्या वास्तू ह्या नष्ट झाल्या आहेत.किल्ल्यात लष्कराचे भरती केंद्र आहे व मोठे मैदान सुद्धा आहे. मैदानापासून सरळ व नंतर उजवीकडे वळल्यावर किल्ल्याची तटबंदी थोडीफार दिसते ह्याच परिसरात किल्ल्यावरचा बुरुज आहे परंतु वेळेअभावी मला तिथे जात आले नाही . पण सध्यातरी किल्ल्यात असणारे मुख्य आकर्षण म्हणजे १२ व्या शतकातील जुनी जैन मंदिरे आणि हिंदू मंदिरे ह्याला \’कमल बसदी\’ म्हणतात.आता ती कशी आहेत काय आहेत हे मी काही वर्णन करत नाही नुसती छायाचित्र पाहूनच तुम्हाला अंदाज येईल आणि त्या काळातल्या कलाकारांना कुर्निसात करावासा वाटेल.एवढेच सांगेल कि ह्यातील एका मंदिरातले दगडी झुंबर म्हणजे स्थापत्य कलेचा अत्यंत सुंदर असा नमुना आहे.
किल्ल्याचे प्रवेशद्वार
कमल बसदी
झुंबर





















Khup chan lihil aahe
LikeLike
Thanks pn naav nahi samjle aple.
LikeLike